कलावंतीन महाल भातोडी
कलावंतीन महाल भातोडी। निजामकलीन सैनिकी प्रशिक्षन केंद्र अहमदनगर शहरापासून दहा मैल अंतरावर भातवडी तलावाजवळ शहाजी व शरीफजी राजांनी घडवलेला जगप्रसिद्ध रणसंग्राम सर्व इतिहासप्रेमीना माहित आहेच, निजामशहा कडून लढताना, #सलाबतखान (निजामशहाचा इंजिनीयर) ने बांधलेला तलाव फोडून आदिलशाही आणि मोगलांचे सैन्य, #शहाजी व शरीफजी राजांनी गनिमी काव्याचा वापर करून परास्त केले होते, मराठ्यांनी जिंकलेले हे पहिले युद्ध. . या युद्धामध्ये मूळ जुना तलाव फोडला गेला त्यानंतर ब्रिटिशांनी आज अस्तित्वात असलेला भातवडी तलाव बांधून काढला, या युद्धात #शरीफजी राजांना वीर मरण आले आणि शहाजीराजांनी त्यांच्या तेराव्याला भातवडीचे जेवण ठेवले तेव्हा या गावाचे भातोडी असे नाव पडले . याच गावात मेहेकरी नदीच्या काठावर #आदिलशहाचा #पेशवा कान्होजी नरसो याने बांधलेले (साल १४४०) नरसिंहाचे उत्तम स्थापत्यशास्त्राचे उदाहरण असलेले मंदिर आहे, मंदिरावर मुस्लिम स्थापत्यशैलीची प्रभाव दिसून येतो . याच #भातोडी गावाच्या जवळ वडगाव दौलाच्या सीमेवर उभारलेले कलावंतीन महाल आहे (१५०८-१५४३), बुरहान शहा या निजाम राजाने आपल्या काळात या वास्तूची निर्मिती...