Posts

पैसचा खांब – ज्ञानोबांचे प्रतीक!

Image
पैसचा खांब – ज्ञानोबांचे प्रतीक! By   अशोक लिंबेकर   संत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे जन्मस्थान व त्यांच्या अलौकिक कार्याचे प्रतीक म्हणजे पैसाचा खांब होय. त्या खांबालाच ‘पैस’, ‘पैसचा खांब’ किंवा ‘ज्ञानोबाचा खांब’ असे म्हणतात. ‘पैसचा खांब’  अहमदनगर जिल्ह्यातील  नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. ते स्थळ नेवासे गावाच्या पश्चिमेला आहे. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ त्या खांबाला टेकून बसून लिहिली असे समजतात. ज्ञानदेवांनी त्या स्थळाचे वर्णन  ‘त्रिभूवनैक पवित्र | अनादी पंचक्रोश क्षेत्र | जेथे जगाचे जीवनसूत्र | श्री महालया असे ||’  असे केले आहे. ज्ञानदेवादी भावंडे  पैठणहून  शुद्धिपत्र घेऊन पुन्हा आळंदीकडे प्रस्थान करताना नेवासा येथे आली. तेथील परिसर गोदावरी आणि प्रवरा या दोन नद्यांच्या खोऱ्यात वसलेला निसर्गरम्य, शांत व अद्भुत आहे. ती भावंडे जवळजवळ दोन वर्षें त्या ठिकाणी राहिली, कारण त्या गावी करविरेश्वराचे (महादेवाचे)  मंदिर  होते. त्याच मंदिरातील या खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका), अमृतानुभव इत्यादी...

मराठा स्वराज्यातील वीर

Image
मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास   Home   ▼ WEDNESDAY, 4 AUGUST 2021 भोसले कुळाची कुळगाथा सांगणारी तीनमजली भव्य बारव - ऐतिहासिक नगरी श्रीगोंदा   भोसले कुळाची कुळगाथा सांगणारी तीनमजली भव्य बारव - ऐतिहासिक नगरी श्रीगोंदा संशोधन व लेखन प्रा.राजेश बाराते भव्य वाड्याचे व प्राचीन मंदिराचे मध्ययुगीन नगर म्हणून श्रीगोंद्याची ओळख आहे.संशोधकांना ऐतिहासिक संशोधनासाठी या नगराचे अनन्य साधारण महत्व आहे. श्रीगोंदा हे नगर जिल्ह्यातील ऐतिहासिक व पौराणिक संपन्न वारसा लाभलेले शहर होय. या शहराला ' श्रीपूर ' असे नाव होते. या श्रीपुरचे ' चाम्भारगोंदे' हेच आजचे श्रीगोंदा अशी विविध नामभिधाने प्राप्त झाली आहेत. श्रीगोंदा शहराला दक्षिण काशी असे म्हटले जाते कारण विठ्ठल मंदिरात प्रति पंढरपूर असा शिलालेख आहे,तसेच ११३ प्राचीन मंदिर हि या ठिकाणी आहे. पुरातन मंदिरे त्यात यादव,मराठापूर्व,मराठाकालीन मंदिरे पाहिल्यास श्रीगोंदा शहराच्या वैभवाची साक्ष नक...

कलावंतीन महाल भातोडी

कलावंतीन महाल भातोडी। निजामकलीन सैनिकी प्रशिक्षन केंद्र अहमदनगर शहरापासून दहा मैल अंतरावर भातवडी तलावाजवळ शहाजी व शरीफजी राजांनी घडवलेला जगप्रसिद्ध रणसंग्राम सर्व इतिहासप्रेमीना माहित आहेच, निजामशहा कडून लढताना, #सलाबतखान (निजामशहाचा इंजिनीयर) ने बांधलेला तलाव फोडून आदिलशाही आणि मोगलांचे सैन्य, #शहाजी व शरीफजी राजांनी गनिमी काव्याचा वापर करून परास्त केले होते, मराठ्यांनी जिंकलेले हे पहिले युद्ध. . या युद्धामध्ये मूळ जुना तलाव फोडला गेला त्यानंतर ब्रिटिशांनी आज अस्तित्वात असलेला भातवडी तलाव बांधून काढला, या युद्धात #शरीफजी राजांना वीर मरण आले आणि शहाजीराजांनी त्यांच्या तेराव्याला भातवडीचे जेवण ठेवले तेव्हा या गावाचे भातोडी असे नाव पडले . याच गावात मेहेकरी नदीच्या काठावर #आदिलशहाचा #पेशवा कान्होजी नरसो याने बांधलेले (साल १४४०) नरसिंहाचे उत्तम स्थापत्यशास्त्राचे उदाहरण असलेले मंदिर आहे, मंदिरावर मुस्लिम स्थापत्यशैलीची प्रभाव दिसून येतो . याच #भातोडी गावाच्या जवळ वडगाव दौलाच्या सीमेवर उभारलेले कलावंतीन महाल आहे (१५०८-१५४३), बुरहान शहा या निजाम राजाने आपल्या काळात या वास्तूची निर्मिती...

मुस्लिम आक्रमणापूर्वी भारतात सर्वात शक्तिशाली राजा आणि साम्राज्य कोणते होते ? त्याचा विस्तार आणि अस्त कसा झाला ?

Image
मुस्लिम आक्रमणापूर्वी भारतात सर्वात शक्तिशाली राजा आणि साम्राज्य कोणते होते ? त्याचा विस्तार आणि अस्त कसा झाला ? गुप्त साम्राज्यानंतर भारताचा इतिहास मध्ययुगीन इतिहासात मोडतो. गुप्त साम्राज्यानंतर हूणांच्या आक्रमणांनी खिळखिळे झाले. त्यानंतर  हर्षवर्धन  या  कनौज  च्या सम्राटाने भारतीय राज्ये पुन्हा एका छत्राखाली आणली. त्याचे साम्राज्य तो जिवंत असे पर्यंत टिकले परंतु प्रभावी वारसदार नसल्याने ते त्यानंतर लगेचच कोसळले. ७ व्या शतकानंतर ते १३ व्या शतकापर्यंत अनेक हिंदू साम्राज्ये उदयास येउन लयाला गेली. १३ व्या शतकातले  विजयनगरचे साम्राज्य  हे शेवटचे मध्ययुगीन हिंदू साम्राज्य होते. या काळात भारतीयांनी स्थापत्यामध्ये फार मोठी प्रगती केली. मध्ययुगाच्या पूर्वाधात ६ व्या शतकात  शंकराचार्यांनी  प्राचीन  अद्वैतवादाचे पुनरुत्थान केले. आपल्या पांडित्याने हिंदू सनातन धर्माला पुन्हा एकदा बळकटी दिली. यानंतर भारतातील बौद्ध धर्माचे प्रस्थ कमी झाल्याचे समजले जाते. या काळात दक्षिण भारत व महाराष्ट्रात  राष्ट्रकूटांचे  राज्य होते तर मध्य व पश्चिम भारतात माल...
Image
आदिलशाही, निजामशाही, बरिदशाही, इमामशाही व कुतुबशाही या 5 शाही कोणी निर्माण केल्या? उत्तर द्या 7 फॉलो करा विनंती करा आणखी 2 उत्तरे आशिष माळी ,  मध्ययुातील इतिहास ची आवड उत्तर दिल्याची तारीख 2020-12-23 बहामनी साम्राज्याने केलेल्या अन्यायामुळे मराठा स्वराज्य निर्माण ल सुरुवात झाली अस म्हटले तर गैर ठरणार नाही. या पाच शाही मधील तीन शाही तर औरंग्याने स्वतःच्या हाताने संपवाल्या. (आदिलशाही, कुतुबशाही आणि बरीदशही) . या पाच शाह्यानी मिळून विजयनगर चे हिंदूंचे साम्राज्य संपवले . पूर्वेतिहास १३३७ मध्ये दिल्लीतील मुहंमद तुघलक काळात अनेक मुस्लिम सरदार बंड करू लागले.त्यात इस्माईल मख नावाच्या सरदाराला सुलतान पदास आवाहन दिले .ते बंड मोडायला मुहंमद तुघलक मोठ्या फौजेनिशी दख्खन मध्ये उतरला.त्याने इस्माईल मखचा दौलताबादला हरवले .पण त्याचं वेळी उत्तरेत देखील बंड चालू झाले आणि त्याला तिकडे जावे लागले.त्याची काही फौज दख्खन येथे राहीली.तेंव्हा सरदार हसन गंगू याने त्या फौजेचा पराभव केला.तेंव्हा इस्माईल मख ने सुलतान पद सोडले व सर्व सरदारांनी मिळून हसन गंगू ला सुलतान म्हणून घोषित केले. मुळ बहामनी सत्त...

छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांची वैशिष्ट्ये कोणती?

Image
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांची वैशिष्ट्ये कोणती? उत्तर द्या 5 फॉलो करा विनंती करा आणखी 5 उत्तरे अनिकेत मराठे ,  विद्यार्थी, सेंट झेविअर्स कॉलेज, मुंबई उत्तर दिल्याची तारीख 2020-6-14 छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा शिवनेरीच्या डोंगराळ किल्ल्यात झाला होता आणि रायगड किल्ल्यात मराठा साम्राज्याचा पहिला छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक देखील झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज्यांचे महाराष्ट्रातील १३ मुख्य किल्ले: १. किल्ले शिवनेरी: जुन्नर जवळील शिवनेरी किल्ला हे शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आणि नुकतंच हा किल्ला हे महाराष्ट्राचे संरक्षित जतन स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. लेनियाद्रि लेणी आणि अष्टविनायक मंदिर हे डोंगराच्या किल्ल्यापासून काही किलोमीटर अंतरावर आहे. २. किल्ले रायगड: महाराष्ट्राच्या महाड भागातील रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता. सह्याद्री पर्वतरांगेत हा डोंगर किल्ला असून ही महाराज्यांच्या काळात मराठा साम्राज्याची राजधानी होती. ३. किल्ले सिंधुदुर्ग: महाराष्ट्राच्या कोकण भागातील मालवण शहराच्या किनारपट्टीवर सिंधुदुर्ग हा कि...