छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांची वैशिष्ट्ये कोणती?
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा शिवनेरीच्या डोंगराळ किल्ल्यात झाला होता आणि रायगड किल्ल्यात मराठा साम्राज्याचा पहिला छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक देखील झाला होता.
छत्रपती शिवाजी महाराज्यांचे महाराष्ट्रातील १३ मुख्य किल्ले:
१. किल्ले शिवनेरी:
जुन्नर जवळील शिवनेरी किल्ला हे शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आणि नुकतंच हा किल्ला हे महाराष्ट्राचे संरक्षित जतन स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. लेनियाद्रि लेणी आणि अष्टविनायक मंदिर हे डोंगराच्या किल्ल्यापासून काही किलोमीटर अंतरावर आहे.
२. किल्ले रायगड:
महाराष्ट्राच्या महाड भागातील रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता. सह्याद्री पर्वतरांगेत हा डोंगर किल्ला असून ही महाराज्यांच्या काळात मराठा साम्राज्याची राजधानी होती.
३. किल्ले सिंधुदुर्ग:
महाराष्ट्राच्या कोकण भागातील मालवण शहराच्या किनारपट्टीवर सिंधुदुर्ग हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला होता. हा सागरी किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेल्या पाच किल्ल्यांपैकी एक आहे.
४. किल्ले प्रतापगड :
सातारा जिल्ह्यातील शौर्याचा किल्ला म्हणून ओळखला जाणारा प्रतापगड किल्ला हा महाबळेश्वर जवळील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्यात प्रतापगडाची लढाई येथे झाली होती जिथे महाराज्यांनी खानाचा चालाखीने वाढ केला होता.
५. किल्ले विजयदुर्ग:
विजयदुर्ग किल्ला आजूबाजूला पाण्याने वेढलेला आहे आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील काही किल्ल्यांपैकी एक हा किल्ला आहे. शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला आणि त्याचे नाव विजयदुर्ग असे ठेवले होते.
६. किल्ले राजगड:
१६६५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या १७ किल्ल्यांपैकी पुणे जिल्ह्यातील राजगड किल्ला ही मराठा साम्राज्याची राजधानी होती.
७. किल्ले तोरणगड:
छत्रपती शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतलेला पुणे जिल्ह्यातील तोरणा किल्ला हा पहिला टेकडी किल्ला होता. हा किल्ला पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच डोंगराचा किल्ला आहे, ज्याची उंची १४०३ मीटर आहे. पुणे व मुंबईहून जवळ असलेले हे ठिकाण प्रवास करणाऱ्यांसाठी हे लोकप्रिय ठिकाण आहे.
८. पन्हाळा:
कोल्हापूर जवळील पन्हाळा किल्ला हा शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतला होता आणि हा दख्खनमधील सर्वात मोठा किल्ला आहे. विजापूरहून निघणाऱ्या व्यापार मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी सह्याद्री पर्वतावर हा किल्ला बांधण्यात आला होता.
९. किल्ले पुरंदर:
पुण्याच्या पश्चिम घाटातील पुरंदर किल्ला हे छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान आहे. पुण्याजवळील पुरंदर व वज्रगड हे दुहेरी किल्ले एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे आणि पॅराग्लाइडर्स आणि ट्रेकर्ससाठी हॉटस्पॉट आहे.
१०. किल्ले लोहगड:
खंडाळ्याजवळ असलेला लोहगड किल्ला हा मराठा साम्राज्यातिल महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय किल्ल्यांपैकी एक आहे. विसापूर आणि लोहगडचा हा दुहेरी किल्ला महाराष्ट्र शासनाने संरक्षित केलेले आहे.
११. किल्ले सिंहगड:
पुण्याचा सिंहगड किल्ला हा सिंहगडच्या लढाईसाठी म्हणजेच तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे ओळखला होता. हा किल्ला पुण्याजवळील लोकप्रिय किल्ल्यांपैकी एक आहे.
१२. किल्ले प्रबळगड:
माथेरान ते पनवेल दरम्यान २,3०० फूट उंचीवरील प्रबळगड हा किल्ला स्थित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत प्रबळगड चा दुहेरी किल्ला इर्शाळगडबरोबरच प्रबळगड किल्ल्याचे नामकरण करण्यात आले होते.
१३. किल्ले सुवर्णदुर्ग:
शिवाजी महाराज यांनी मुंबई ते गोव्याच्या मध्यभागी स्थित सुवर्णदुर्ग किल्ला बांधला. कणकदुर्ग किल्ला व पद्मदुर्ग किल्ला यासह काही ऐतिहासिक सागरी किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले.
शिवाजी महाराजांनी बांधलेल्या व ताब्यात घेतलेल्या महाराष्ट्राच्या भव्य किल्ल्यांमध्ये तिकोना किल्ला, कोरीगड किल्ला, विसापूर किल्ला, तुंग किल्ला, इर्शालगड किल्ला, कर्नाळा किल्ला, दुर्गाडी किल्ला, कासा किल्ला होता आणि लिंगना किल्ला देखील शिवाजी महाराजांनी बांधला होता.
फोटो स्त्रोत: गूगल आणि वॉक थ्रू इंडिया
उत्तर आवडले असेल तर अपवोट नक्की करा आणि मला फॉलो करा.
धन्यवाद.
आपल्या लाडक्या राजपुत्र चा , अकबर च, पाठलाग करत पाच लाख ची फौज घेऊन घुसलेला औरंगजेबाला वाटले की मराठा साम्राज्य एखाद्या वर्षात पडेल . पण पहिलच किल्ला, रामशेज घेता घेता त्याला सात वर्ष लागले. हो रामशेज, तोच रामशेज ज्यावर फक्त 700 शिबंदी सोबत एक अनोळखी किल्लेदार सात वर्ष लोखंडी तोफा शिवाय ( लाकडाच्या तोफा बनवल्या)झुंजला. जर एखादा अती सामान्य किल्ला इतकी झुंज देऊ शकतो तर 360 किल्ले घ्यायला किती वेळ लागेल? असा विचार करत औरंग्याला आपली रणनीती बदलायला भाग पडले. पण 27 वर्ष या झुंजी ने "या जिंदा पीर" ल फक्त अपयश आले, अनेक जवळचे प्रिय लोक मरण पावले. शेवटी जाता जाता त्याचा मृत्यू याच साम्राज्यात झाला.
अश
शिवाजी महाराज, महाराष्ट्राचा महान योद्धा राजा, उत्कृष्ट लष्करी आणि गनिमी युक्ती म्हणून प्रसिध्द असलेले, अनेकदा महाराष्ट्राचा अभिमान म्हणून सांगितले जाते. त्याच्या चांगल्या अंमलात आणल्या गेलेल्या कारभारामुळे त्यांना रणनीतिक नियोजनासह विजयाच्या मार्गावर नेले. महाराष्ट्राच्या किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी त्यांनी पहिल्यांदाच भारतीय नौदलाच्या निर्मितीचा मार्ग दाखवला. मराठवाड्यात त्याच्या कारकिर्दीत जवळजवळ for 360 किल्ले ताब्यात घेण्याचे श्रेय शिवाजी महाराजांना देण्यात आले.
शिवाजी महाराजांचे विचारच त्यांच्या स्वराज्याची प्रेरणा होती. त्यामुळे महाराजांचे हे विचार जाणून घेणे फार महत्वाचे आहेत. शिवजयंत
खरंतर या प्रश्नाचे, अतिशय अप्रतिम उत्तर आशिष माळी सरांनी लिहिले आहे. ते उत्तर इतके अप्रतिम आहे की, कोराच्या सर्वोत्कृष्ट उत्तरात त्याचा समावेश झालेला आहे. त्यामुळे याप्रश्नावर मी उत्तर लिहिण्याची उठाठेव का करावी, या विचाराने मी या प्रश्नावर उत्तर देण्याचं टाळत होतो. पण नुकतेच छत्रपती शिवाजी महाराजांसंबंधित एक पुस्तक वाचून काढले, तेव्हा मात्र ही उठाठेव करावी असे वाटल्याने , यावर उत्तर लिहायला घेतले.
'संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग' या एकाच वाक्यात मध्ययुगीन काळातील किल्ल्यांचे महत्त्व रामचंद्रपंत अमात्य यांनी 'आज्ञापत्रा'त स्पष्ट केले आहे. १७ व्या शतकात शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकून तसेच उभारून
आजही किल्ले साडेतीनशे वर्षा नंतर ही ताठ मानेने पूर्ण जगाला सांगताहेत की आमच्या मजबूती मागे छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद होती…व मावळ्यांची मेहनत आहे.,…. प्रदेश सुरक्षित ठेवण्यासाठी किल्ले असणे गरजेचे आहे….. जय शिवराय

Comments
Post a Comment