श्री पी. एन. देसाई सहा. शिक्षक श्री. मौनी महाराज हायस्कूल पाटगांव
श्री मौनी महाराज
-
श्री मौनी महाराज
मौनी महाराज : (सु. सतरावे शतक). एक शिवकालीन महाराष्ट्रीय सत्पुरुष,
मौनी मठाचे प्रवेशद्वार
मौनी महाराज पाटगांव येथे आल्यानंतर धर्ममार्तंडांच्या छळाला कंटाळून त्यांनी मौन धारण केले. त्यामुळे त्यांना ‘मौनी’ हे नाव मिळाले. त्यांना मौनी बाबा वा मौनी बुवा असेही म्हणत. ते उत्तूर (ता. आजरा, जि. कोल्हापूर) या गावाहून आले आणि कोल्हापूर जिल्ह्यातील रांगणा किल्ल्याजवळील पाटगाव (ता. भुदरगड) या गावी वास्तव्य करून राहिले.
मौनी महाराज मठ पाटगांव (सभा मंडप )
मौनी बाबांच्या पूर्वायुष्याबद्दल माहिती मिळत नाही. त्यांच्या मठातील जीवनक्रम नाथपंथांपैकी अवधूत उपपंथाशी काहीसा मिळता-जुळता होता. गोसाव्यांच्या ‘गिरी’ नावाच्या पंथाशी त्यांचा संबंध असण्याचाही संभव आहे.
सभा मंडपातील आतील भाग
मौनी महाराज कथाकीर्तनाच्या माध्यमांतून सर्वसामान्य लोकांना उपदेश करीत. त्यांच्या कीर्तनातून वेदवाणी व्यक्त होत असल्यामुळे धर्ममार्तंडांनी तुकारामांप्रमाणेच त्यांचा फार छळ केला.
सहभागी तरुण कार्यक्रते
मौनी बाबांची तुकाराम व रामदास यांच्याशी ओळख होती शिवाजी महाराजांनी दक्षिणेच्या स्वारीवर जाण्यापूर्वी १६७६ मध्ये त्यांची पहिल्यांदा भेट घेतली होती शिवाजी महाराजांनी रायगडावर भरविलेल्या एका संतपरिषदेस ते उपस्थित होते इ. प्रकारची माहिती मिळते. शिवाजी महाराजांनी मौनी मठास दरसाल एक हजार माणसांना पुरेल एवढा शिधा देण्याची व्यवस्था केली होती तसेच,
लाकडी खांबावरील नक्षीकाम
मठातील पुराणिक, हरदास इत्यादींसाठी दरसाल अठरा होनांची तरतूदही केली होती यासंबंधीच्या सनदा उपलब्ध आहेत. शिवदिग्विजय या बखरीत मौनी महाराजांचा उल्लेख आढळतो. इतिहाससंशोधक कै. सरदेसाई, शेजवलकर इ. तज्ञांनी मौनी महाराज व शिवाजी यांच्या गुरुशिष्यसंबंधाला दुजोरा दिला आहे. आद्य छत्रपतींच्या पश्चात संभाजी, राजाराम आणि ताराबाई यांनीही मौनी बाबांच्या मठाच्या यथायोग्य परामर्श घेतला.
लाकडी खांबावरील नक्षीकाम (पावसाळ्यातील दृश्य )
मौनी महाराजांचा बहुतेक सर्व कोकणपट्टीत संचार होई. ते कसलाही भेदभाव पाळीत नसत. ते हयात असताना लांबलांबचे लोक त्यांच्या दर्शनास येत. १६८६ मध्ये त्यांनी पाटगाव येथे जिवंत समाधी घेतली, असे म्हणतात.
मौनी महाराज समाधी
त्यानंतर संभाजी महाराजांच्या पाठिंब्याने तुरुतगिरी हे (१७२८ पर्यंत) पीठपती झाले. तुरुतगिरींनी मौनींच्या समाधीपुढील सभामंडप, नगारखाना इ. इमारती बांधल्या. दरवर्षी रथसप्तमीपासून पुढे सहा दिवस पाटगाव येथे बाबांच्या पुण्यतिथीचा उत्सव होतो.
प्रवेशद्वारा वरील नक्षीकाम
कोकणात मालवण, सिंधुदुर्ग किल्ला, बाळे घोल (ता. कागल) व पांगिरे (कर्नाटक राज्य) येथे त्यांच्या मूर्ती आहेत. पाटगावमध्ये त्यांची शिवाजी महाराजांशी जेथे भेट झाली, तेथे ‘दर्शनस्थळ’ आहे.
समाधी मंदिरासमोरील
मौनी बाबांची व त्यांच्या पीठाची परंपरा मराठे-ब्राह्मणेतरांची होती. कोल्हापूरच्या गादीवरील सर्वच छत्रपती या पीठाला फार मान देत.
शिवाजी राजेंना आशीर्वाद देताना मौनी महाराज (एक शिल्प )
राजर्षी शाहू महाराजांना वेदोक्त प्रकरणाच्या संदर्भात या पीठाचा पूर्वेतिहास अनुकूल वाटला. त्यांनी सदाशिवराव पाटील या मराठा पदवीधराला या पीठावर अधिष्ठित करून क्षात्रजगद्गुरू या नावाने शंकराचार्यांचे स्वतंत्र पीठ निर्माण केले.
मौनी बाबांचे स्मारक म्हणून १९५२ मध्ये गारगोटी (जि. कोल्हापूर) येथे मौनी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे.
मौनी विद्यापीठाचे ब्रीदवाक्य
मौनी विद्यापीठाचे ब्रीदवाक्य
छत्रपती शिवाजी महाराज्यांचे गुरु श्री मौनी महाराज हे त्या काळी विजापूरचा राजकारभार हाताळत होते. शिवाजी महाराज जेव्हा कर्नाटक राज्यामध्ये गेले असता त्यांची भेट मौनी महाराज्यांशी झाली.
जगद्गुरु महाराजांची समाधी
या मठासाठी वापरण्यात आलेला दगड हा कोल्हापूर जवळ असलेल्या जोतीबा डोंगर येथून आणण्यात आला.
सुंदर शिल्प
काही काळ उलटल्यानंतर मौनी महाराजांनी सर्व गोष्टींचा त्याग करून तपश्चर्येचा मार्ग अवलंबला.याच मौनी महाराजांना शिवाजी महाराजांनी आपले गुरु मानले.श्री.मौनी महाराजांच्या वास्तव्यामुळेच पाटगाव या ठिकाणाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले.
मौनी महाराज वास्तव्यास असलेल्या ठिकाणी एक नयनरम्य व अतिशय सुंदर कलाकुसर असलेला मठ उभारण्यात आला आहे.
मठाच्या छपरासाठी तांब्याचे पत्रे वापरण्यात आले आहेत. मठाच्या मागच्या बाजूस शिवाजी महाराज व श्री मौनी महाराज यांच्या भेटीचे ठिकाण आहे.शिवाजी राजे दक्षिणेच्या स्वारीवर जाण्याआधी आपले गुरु मौनी महाराज यांची भेट घेण्यासाठी पाटगाव येथे आले होते.
श्री मौनी महाराजांच्या नावाने स्थापन झालेली शाळा श्री मौनी महाराज हायस्कूल &जुनिअर कॉलेज पाटगांव
शिवाजी राजेंना आशीर्वाद देताना मौनी महाराज
मौनी महाराजांची फुलांनी सजवलेली समाधी (दि. 27/07/2020)
पैसचा खांब – ज्ञानोबांचे प्रतीक! By अशोक लिंबेकर संत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे जन्मस्थान व त्यांच्या अलौकिक कार्याचे प्रतीक म्हणजे पैसाचा खांब होय. त्या खांबालाच ‘पैस’, ‘पैसचा खांब’ किंवा ‘ज्ञानोबाचा खांब’ असे म्हणतात. ‘पैसचा खांब’ अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. ते स्थळ नेवासे गावाच्या पश्चिमेला आहे. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ त्या खांबाला टेकून बसून लिहिली असे समजतात. ज्ञानदेवांनी त्या स्थळाचे वर्णन ‘त्रिभूवनैक पवित्र | अनादी पंचक्रोश क्षेत्र | जेथे जगाचे जीवनसूत्र | श्री महालया असे ||’ असे केले आहे. ज्ञानदेवादी भावंडे पैठणहून शुद्धिपत्र घेऊन पुन्हा आळंदीकडे प्रस्थान करताना नेवासा येथे आली. तेथील परिसर गोदावरी आणि प्रवरा या दोन नद्यांच्या खोऱ्यात वसलेला निसर्गरम्य, शांत व अद्भुत आहे. ती भावंडे जवळजवळ दोन वर्षें त्या ठिकाणी राहिली, कारण त्या गावी करविरेश्वराचे (महादेवाचे) मंदिर होते. त्याच मंदिरातील या खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका), अमृतानुभव इत्यादी...
कलावंतीन महाल भातोडी। निजामकलीन सैनिकी प्रशिक्षन केंद्र अहमदनगर शहरापासून दहा मैल अंतरावर भातवडी तलावाजवळ शहाजी व शरीफजी राजांनी घडवलेला जगप्रसिद्ध रणसंग्राम सर्व इतिहासप्रेमीना माहित आहेच, निजामशहा कडून लढताना, #सलाबतखान (निजामशहाचा इंजिनीयर) ने बांधलेला तलाव फोडून आदिलशाही आणि मोगलांचे सैन्य, #शहाजी व शरीफजी राजांनी गनिमी काव्याचा वापर करून परास्त केले होते, मराठ्यांनी जिंकलेले हे पहिले युद्ध. . या युद्धामध्ये मूळ जुना तलाव फोडला गेला त्यानंतर ब्रिटिशांनी आज अस्तित्वात असलेला भातवडी तलाव बांधून काढला, या युद्धात #शरीफजी राजांना वीर मरण आले आणि शहाजीराजांनी त्यांच्या तेराव्याला भातवडीचे जेवण ठेवले तेव्हा या गावाचे भातोडी असे नाव पडले . याच गावात मेहेकरी नदीच्या काठावर #आदिलशहाचा #पेशवा कान्होजी नरसो याने बांधलेले (साल १४४०) नरसिंहाचे उत्तम स्थापत्यशास्त्राचे उदाहरण असलेले मंदिर आहे, मंदिरावर मुस्लिम स्थापत्यशैलीची प्रभाव दिसून येतो . याच #भातोडी गावाच्या जवळ वडगाव दौलाच्या सीमेवर उभारलेले कलावंतीन महाल आहे (१५०८-१५४३), बुरहान शहा या निजाम राजाने आपल्या काळात या वास्तूची निर्मिती...
खर्डा एक ऐतिहासिक शहर. इतिहासातील प्रसिद्ध खरड्याची लढाई हैदराबादचा निजाम व मराठ्यांमध्ये ११ मार्च १७९५ रोजी लढाई झाली. त्यात मराठ्यांनी निजामाचा पराभव केला होता. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील शिर्डी-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील खर्डा हे गाव ऐतिहासिक वास्तुचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. मराठवाड्यातून नगर जिल्ह्यात प्रवेश करताना भव्य तटबंदी असलेला भुईकोट किल्ला प्रवाशांचे लक्ष वेधून घेतो. महादजी शिंदे यांचे वारस दौलतराव शिंदे यांच्याशी नाना फडणवीसांचे संबंध सुधारलेले होते आणि शिंद्यांची विशाल सेना पुणे येथे असल्याने त्याचा फायदा घेऊन मराठा सत्तेचा प्रभाव दक्षिणेत वाढविण्याचे नानांनी ठरविले आणि हैदराबादच्या निजामावर लक्ष केंद्रीत करुन त्याच्याकडे थकलेल्या चौथाईची मागणी केली. निजामाचा मंत्री मुशीर मुल्कने ही चौथाईची मागणी फेटाळून लावतानाच भोसल्याचा वऱ्हाडातील महसुलावरील अधिकारही नाकारला. परिणामी पेशवा, दौलतराव शिंदे, तुकोजी होळकर आणि दुसरा रघुजी भोसले यांच्या संयुक्त फौजांनी मार्च, इ.स. १७९५ मध्ये निजामाच्या प्रदेशावर आक्रमण केले. मराठ्यांनी निजामावर आक्रमण केल्यावर ...
Nice
REPLYVery nice
REPLY